top of page

त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमा महत्त्व आणि लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी उपाय

Updated: Jun 11, 2024


त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमा महत्त्व आणि लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी उपाय


भगवान शिवशंकराच्या संपूर्ण परिवाराच्या पूजेचे त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्व आहे. या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या एका महान राक्षसाचा वध केला होता. या राक्षसाच्या वधानंतर त्रिपुरारी असे, भगवान शिव यांचे एक नावही प्रसिद्ध झाले.


कार्तिक पौर्णिमेवर कार्तिकेयांच्या पूजेलाही महत्त्व आहे. कार्तिकस्वामी सहा कृतिकांचा प्रिय मुलगा मानला जातो. कार्तिक पौर्णिमेवर शिव, संभूती, शांती, प्रीती, अनुसूया आणि क्षमा या नावाच्या कृतींची पूजा केल्यास भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंब प्रसन्न होते.


🪔शिव कुटुंबाला मध व दुधाने अभिषेक केल्यास अक्षय फळ मिळते.

🪔कार्तिक पौर्णिमेला माता पार्वती आणि कार्तिकेयांची पूजा करावी कारण कार्तिकेयचा हा दिवस वाढदिवस मानला जातो.

🪔या दिवशी लक्ष्मीची विशेष कृपा मिळण्यासाठी भगवान विष्णूसमवेत देवी लक्ष्मीची पूजा करावी. श्रीसुक्त पाठ आणि विष्णूसहस्त्र नाम पाठ करावा.

🪔माता लक्ष्मीला व चंद्राला तांदळाची खीर व गोड भात नैवैद्य दाखवून प्रसन्न करतात.

🪔पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर पिंपळास गोड दूध आणि पाणी द्यावे.

🪔देवदिवाळी देखील या दिवशी मानली जाते. दिवाळी प्रमाणेच घरात दिवे लावावे. यामुळे देवतांना आनंद होऊन ते प्रसन्नतेने आशीर्वाद देतात.

Comments


Ssaivastu logo file

Ssaivastu is offering Vastu consultancy, remedies & education to help individuals & enterprises to lead a meaningful life with modern and proven techniques.

Quick Connect. Write us a message

Thanks for submitting!

Address:

Ssaivastu -

G-56, The Zone Mall, Ground Floor, Chandawarkar Road, Borivali West, Mumbai 400092.

Contact:

+919619909979

+919082787149

email: 

ashish.karekar@ssaivastu.com

  • YouTube
  • Facebook
  • Instagram

Copyright © 2022 Ssaivastu. All Rights Reserved.  Designed by Ssaivastu

bottom of page